सध्या मुंबई गोवा चौपदरीकरण वेगाने सुरु आहे तर दुसरीकडे कोकणकिनाऱ्यावरून ग्रीनफिल्ड हायवेची लगबग सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणाला नवी समृद्धी देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचीही जोरात चर्चा आहे.
यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव दिले गेले आहे. शक्तीपीठांसह विविध धार्मिक स्थळे जोडली गेल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ मराठवाड्यातुन थेट येणारा पर्यटक कमी वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट येऊ शकणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग हा देवी भक्तांना देवी दर्शनासाठी प्रशस्त असा महामार्ग बनणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक देवी मंदिर आहेत, त्यामुळे या मंदिराकडे भाविक वर्ग सहज दर्शनाला येणे शक्य होणार असल्याने आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे.