स्वच्छ सागर किनाऱ्यासाठी आता 'मनसेसाद'

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. शनिवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पर्यावरण प्रेमींना आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित या 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेत' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरही मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहेत. कोकणातील पाचही किनारपट्टीवर 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा स्वच्छता मोहीम अभियानासाठी नंदकिशोर तळवडेकर यांची अभियान संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सागरी किनारे हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आज पर्यटनदृष्ट्या आज लौकिक मिळवत असताना मनसेची ही मोहीम आज एका मोठ्या सामाजिक जबाबदारीची नांदी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.