भारतात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार असल्याचा मोठा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे आता ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे त्या रुग्णालयांना सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे.
नवीन नियमावलीनुसार अवयवदानासाठी शवविच्छेदन प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे शवविच्छेदन करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येईल. तसेच रात्रीच्या वेळीही शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकोर्डिंग केले जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.